ठाण्याला नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयासह दोन तहसील कार्यालय होणार, ठाणेकरांच्या मालमत्ता आणि हक्क सुरक्षेसाठी शासन कटिबद्ध….छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान लोकाभिमुख आणि गतिमान कारभाराचे उत्तम उदाहरण – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे!
ठाणे, दि. ३०:- ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील तब्बल ७६ हजार कुटुंबांना शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात यश आले असून, हे अभियान लोकाभिमुख आणि गतिमान कारभाराचे उत्तम उदाहरण ठरले आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज
