Jalna – मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सकारात्मक संवादातून तोडगा काढण्याची शासनाची भूमिका – मंत्री शंभूराज देसाई!
जालना, दि. २४ : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाची भूमिका सकारात्मक असून, संवाद आणि समन्वयातून या प्रश्नावर योग्य तो मार्ग काढण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी तपासून तोडगा काढण्यासाठी शासनाचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. कुणबी नोंदींची संख्या कमी होणार
