Zarkhand: विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ भाजपचा आज झारखंड बंद; बाबूलाल मरांडी यांचा सरकारवर निशाणा!
ताज्या बातम्या

Zarkhand: विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ भाजपचा आज झारखंड बंद; बाबूलाल मरांडी यांचा सरकारवर निशाणा!

Aug 11, 2026

झारखंड ११ : झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ भारतीय जनता पक्षाने आज, ११ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात बंदची घोषणा केली आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. मात्र आरोग्य सेवा तसेच देवघरासह इतर धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या भाविकांना या बंदमधून वगळण्यात आले आहे.जयपाल सिंह मुंडा स्टेडियम परिसरात विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. वादग्रस्त परीक्षा रद्द करावी तसेच संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. सरकारकडून विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह भाजप नेत्यांनी सरकारवर जोरदार आरोप केले. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षांबाबत सातत्याने वाद निर्माण होत असून, JPSC आणि JSSC परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. CGL, सहाय्यक आचार्य, PGT तसेच उत्पादन सिपाही यांच्या भरती प्रक्रियेसह अनेक नियुक्ती प्रक्रियांमध्ये गैरप्रकार झाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला.विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, वॉटर कॅननचा वापर केला तसेच विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. या कारवाईमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचेही भाजपकडून सांगण्यात आले.

आंदोलनासाठी उभारण्यात आलेला विद्यार्थ्यांचा मंडप हटवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.भाजप नेत्यांनी सांगितले की, विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. वादग्रस्त परीक्षा रद्द करण्यासोबतच या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. राज्याच्या तपास यंत्रणांवरील विश्वास राहिलेला नसल्याने प्रकरणांची स्वतंत्र चौकशी आवश्यक असल्याचे भाजपने म्हटले आहे.विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपने आज झारखंड बंदचे आवाहन केले असून, सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने चर्चा करून योग्य तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी पुन्हा गैरवर्तन किंवा कारवाई झाल्यास भाजप त्याचा तीव्र विरोध करेल, असा इशाराही पक्षाच्या नेत्यांनी दिला आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *