Thane: 900 खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार;खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत रुग्णालयाची पाहणी!
ठाणे (14) : ठाण्यातील सर्वसामान्य, गरीब व गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणारे विठ्ठल सायन्ना रुग्णालय (जिल्हा सामान्य रुग्णालय) डिसेंबरअखेर नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार खासदार नरेश म्हस्के यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर, पदाधिकारी, बांधकाम विभाग व महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत
New Mumbai : नवी मुंबई येथील सिडकोच्या अखत्यारीतील १४ स्थानके मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित…स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रेल्वे प्रवाशांना मोठी खुशखबर; प्रवास होणार अधिक सुखकर..खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!
ठाणे/नवी मुंबई – सिडको प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या रेल्वे स्थानकांची देखभाली अभावी पार दुरावस्था झाली होती. यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. निवडून आल्यानंतर ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ही समस्या सोडविण्यासाठी युध्दपातळीवर सिडको, मध्य रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या.
Thane:’शुद्धीकरण’ नव्हे, ही जातीय मानसिकता..ठाणे काँग्रेसचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; खरगेंच्या सभास्थळाच्या कथित शुद्धीकरणाविरोधात सत्याग्रह; राहुल पिंगळेंचा जातीय मानसिकतेविरोधात इशारा!
ठाणे १४ : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील हल्दवानी येथील सभेनंतर सभास्थळाचे गंगाजल शिंपडून कथित शुद्धीकरण करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या घटनेच्या माध्यमातून जातीयवादी आणि प्रतिगामी मानसिकता समोर आल्याचा आरोप
Rahul Gandhi : सावरकर टिप्पणी प्रकरण: राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा मोठा कायदेशीर दिलासा!
सावरकर टिप्पणी प्रकरण: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या कथित वक्तव्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली फौजदारी मानहानीची तक्रार आणि संबंधित दंडाधिकार्यांनी (मजिस्ट्रेट) जारी केलेला समन्सचा
Thane: ठाण्यात मुंबई ३च्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती; पाणीपुरवठा प्रभावित होण्याची शक्यता!
ठाणे १४ : ठाण्यातील तीन हात नाका परिसरात ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या बाजूला असलेल्या ‘मुंबई ३’ च्या ३,००० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असून मुंबई परिसरातील पाणीपुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Thane: ठाण्याच्या कचऱ्यामुळे भिवंडीत दुर्गंधी; १२ गावांतील रहिवाशांची उच्च न्यायालयात धाव!
ठाणे १४: ठाणे शहरात दररोज सुमारे १,२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यातील सुमारे ८०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा दावा ठाणे महापालिकेकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात शहरातील तब्बल ६० टक्के कचरा भिवंडीतील आतकोली भागात टाकला जात आहे. तेथील ८५ एकर
Devendra fadnavis: महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाणार नाही; कंपनी स्थलांतराच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर!
पुणे १४: पुण्यातील चाकण एमआयडीसीमधील कंपन्या बाहेर जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत शरद पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राहिला असून पायाभूत सुविधांच्या अभावामुळे कंपन्या बंद होणे किंवा स्थलांतरित होणे राज्यासाठी भूषणावह नाही, असा दावा त्यांनी केला होता.शरद
Kalyan: केडीएमसी रुग्णालयाचा निष्काळजीपणा; फ्रॅक्चर झालेल्या रुग्णाच्या पायाला प्लास्टरऐवजी बांधला पुठ्ठा!
कल्याण १४ : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील कथित बेजबाबदार कारभाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाच्या पायाला फ्रॅक्चर झाले असताना, त्यावर योग्य प्लास्टर करण्याऐवजी चक्क पुठ्ठा बांधून आधार देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर रुग्णालयात
Mumbai news : अमूल व गोकुळच्या नावाखाली दुधात अशुद्ध पाण्याची भेसळ: कांदिवलीतून आरोपीला रंगेहाथ अटक, ७४ लिटर बनावट दूध जप्त!
मुंबई १४ : मुंबईतील कांदिवली पूर्व परिसरात नामांकित कंपन्यांच्या दुधात अशुद्ध पाण्याची भेसळ करून ते दूध ग्राहकांना विक्री करण्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी समतानगर पोलिसांनी एका इसमाला रंगेहाथ अटक केली आहे. ईरन्ना लिंगय्या गोपनाबोनई (वय ४८, रा. रामउजागर चाळ, लक्ष्मीनगर, दामुनगर लास्ट
Dombivli: डोंबिवलीत १५ ऑगस्टला भव्य तिरंगा फेरी: ३५ हजार चौरस फुटांच्या राष्ट्रध्वजासह नवा विश्वविक्रम रचणार!
डोंबिवली १३ : देशभक्ती आणि राष्ट्राभिमानाची नवी ज्योत प्रज्वलित करत यंदाचा स्वातंत्र्यदिन डोंबिवलीत एका अभूतपूर्व सोहळ्याने साजरा होणार आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शहरातील १०० हून अधिक सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट रोजी एका भव्य ‘तिरंगा फेरी’चे आयोजन करण्यात आले आहे.
