Thane: रायलादेवी तलाव परिसरातील कामांचा आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आढावा!
ठाणे ०६ : रायलादेवी तलावाच्या सुशोभीकरण व विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात आज बैठक पार पडली. बैठकीत पहिल्या टप्प्यातील कामांची सद्यस्थिती, दुसऱ्या टप्प्याचे नियोजन तसेच सुरक्षा, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आज झालेल्या बैठकीस
सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा दावा: ‘अपात्रतेचा निकाल लागण्याआधीच शिंदेंना पक्ष आणि चिन्ह दिलं’!
मुंबई: ०६ सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर दुसऱ्या दिवशीची सुनावणी पार पडली. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल लागण्यापूर्वीच आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि
माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” अभियानांतर्गत ऑगस्ट महिन्यात विविध आरोग्य जनजागृती उपक्रमांचे आयोजन…कुष्ठरोग, नेत्ररोग व हत्तीरोग प्रतिबंधासाठी विशेष मोहीम; नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव!
ठाणे, दि. ०६ (जिल्हा परिषद, ठाणे) : महाराष्ट्र शासनाच्या “माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यात माहे ऑगस्ट २०२६ दरम्यान विविध आरोग्यविषयक जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, रोगनियंत्रण कार्यक्रम तसेच ग्रामस्तरावरील आरोग्यविषयक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. प्रत्येक गाव स्वच्छ, निरोगी,
गोविंदांच्या सुरक्षेला युवा सेनेच्या पाठपुराव्याचे यश; राज्य सरकारकडून १.६० लाख गोविंदांना विमा संरक्षण – युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश!
मुंबई, दि. ६ : दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य सरकारने सन २०२६ साठी महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार असून, यासाठी युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश
SIR ऑनलाइन फॉर्म: नोंदणी प्रक्रिया आणि अंतिम मुदत; जाणून घ्या सविस्तर!
मतदार यादीच्या Special Intensive Revision (SIR) मोहिमेअंतर्गत ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सध्या सुरू असून १७ ऑगस्ट ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. पात्र नागरिकांनी वेळेत अर्ज न केल्यास त्याचा परिणाम मतदार यादीतील नोंदींवर होऊ शकतो, त्यामुळे वेळेत नोंदणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही प्रक्रिया
१ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले व्यवहारिक मराठीचे धडे;‘मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक….१५ ऑगस्टपर्यंत उर्वरित चालकांना सुवर्णसंधी!
मुंबई, दि. ६ ऑगस्ट :”महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल, तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे, तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी दोन प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो,” अशा भावनिक शब्दांत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी
रिक्षा-टॅक्सी चालकांवर १८ ऑगस्टपासून कारवाईची टांगती तलवार; मराठी भाषेसाठी दिलेली मुदतवाढ शासनाने फेटाळली!
मुंबई ०६: राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी १५ ऑगस्टपर्यंत मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्यात आले होते. या नियमानंतर राज्यभरात मराठी भाषा प्रशिक्षण वर्गांना चांगला प्रतिसाद मिळाला असून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहकार्याने राज्यातील ३६ पैकी ३२ जिल्ह्यांत हे वर्ग राबवण्यात आले.
२२ वर्षांची प्रतीक्षा संपली; ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा…समग्र शिक्षा अभियानासाठी ऐतिहासिक निर्णय; निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्याला यश!
मुंबई ०६ : तब्बल २२ वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानात कंत्राटी तत्त्वावर सेवा बजावणाऱ्या ३,२७६ कर्मचाऱ्यांना अखेर न्याय मिळाला आहे. राज्य शासनाने एकवेळच्या विशेष बाब म्हणून समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करून पात्र कर्मचाऱ्यांना त्यावर नियुक्ती देण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय जाहीर केला आहे. या
ठाण्यातील १२,२०० कोटींच्या अंतर्गत रिंग रूट मेट्रोला ‘वेक अप ठाणेकर’चा विरोध; २,००० कोटींत पर्यायी व्यवस्था उभारण्याचा दावा!
ठाणे ०६: ठाणे शहरातील वाढती वाहतूककोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या १२,२०० कोटी रुपयांच्या ‘अंतर्गत रिंग रूट मेट्रो प्रकल्पाला’ ‘वेक अप ठाणेकर’ या नागरिकांच्या संस्थेने तीव्र विरोध दर्शवला आहे. हा प्रकल्प अत्यंत वेळखाऊ असून शहराच्या सध्याच्या गरजांशी सुसंगत नाही, तसेच यावर १२,२०० कोटी रुपये
ठाण्यात धक्कादायक घटना: आंबे-घोसाळे तलावात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह; राबोडी पोलिसांकडून तपास सुरू!
ठाणे ०६: ठाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, ठाणे पश्चिम येथील कॅसल मिल परिसरातील आंबे-घोसाळे तलावात एका अंदाजे ५५ ते ६० वर्षे वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.सोमवारी सकाळी ९:२५ च्या सुमारास कॅसल मिल
